नवी दिल्ली :- महापौर निवडणुकीच्या मतदानादरम्यान कॉंग्रेसने सभागृहातून सभात्याग केला. त्यावरून आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्या आतिशी यांनी कॉंग्रेसवर हल्ला चढवला आहे, त्यांनी म्हटले आहे की, हा प्रकार म्हणजे कॉंग्रेसने भाजपशीच हातमिळवणी केल्याचा पुरावा आहे. आतिशी म्हणाल्या, कॉंग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाशी रितसर हातमिळवणी केली आहे.
कॉंग्रेसच्या वॉकआऊटचा फायदा भारतीय जनता पक्षालाच होईल, असा आरोप आतिशी यांनी केला. कॉंग्रेसला स्थायी समितीच्या निवडणुकीतही भाजपला मदत करायची आहे, त्यामुळे कॉंग्रेस पक्षाने सभात्यागाची घोषणा केली आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
तथापि, हे काहीही असले तरी महापौर आणि उपमहापौरांसह सहाही स्थायी समितीच्या निवडणुका आम आदमी पक्ष जिंकणार आहे, असा दावा त्यांनी केला.
Maharashtra : महिला आयोगाच्या नोटीसीनंतर चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या” अशा 56…”
दरम्यान, आज मुद्दाम गोंधळाची स्थिती निर्माण करून भाजपने आपली पात्रता दाखवून दिली आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे. दिल्ली महापालिकेतील आपले घोटाळे बाहेर येऊ नयेत म्हणून भाजप आणखी किती खालच्या थराला जाणार आहे, असा सवालही त्यांनी ट्विटरवर केला आहे.