मुंबई : अंतिम वर्षाची परीक्षा होणार नसल्याची घोषणा राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. अशात विरोधकांकडून बॅकलॉग व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. त्यावर आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत ट्विट करत विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे.
बीए, एमए, बीएसस्सी, एमएसस्सी आणि बीकॉम, एमकॉम या पारपंरिक अर्थात अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाची परीक्षा होणार नसल्याची घोषणा राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी केली. त्याचप्रमाणे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्ष अथवा सत्राची परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, अशी घोषणा उदय सामंत यांनी १९ जून रोजी केली होती. यानंतर बॅकलॉग व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. यावर उदय सामंत म्हणाले कि, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या व बॅकलॉगच्या विदयार्थ्यांनी कुणाच्याही अपप्रचाराला बळी पडू नये. सरकार आपाल्या सोबत आहे. काही लोक आपल्या भवितव्याशी खेळत आहेत व स्वतःच्या अस्तित्वासाठी विद्यार्थ्यांचा उपयॊग करताहेत माझ्या विदयार्थी मित्र मैत्रिणींनो काळजी करू नका मी तुमच्या सोबत आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या व बॅकलॉगच्या विध्यार्थ्यानी कुणाच्याही अपप्रचाराला बळी पडू नये. सरकार आपाल्या सोबत आहे. काही लोक आपल्या भवितव्याशी खेळत आहेत व स्वतःच्या अस्तित्वासाठी विद्यार्थ्यांचा उपयॊग करताहेत माझ्या विध्यार्थी मित्र मैत्रिणींनो काळजी करू नका मी तुमच्या सोबत आहे.
— Uday Samant (@samant_uday) June 21, 2020
दरम्यान, व्यावसायिक व अव्यावायिक अभ्यासक्रमांतील ज्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना बॅकलॉग विषय राहिले आहेत, त्यांच्या विषयीचा परीक्षेसंदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू व संबंधित अधिकारी यांची शासनस्तरावर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे सामंत यांनी म्हटले आहे.