हैदराबाद – तेलंगणामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तेलंगणातील १२ वी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर ३० तासांत राज्यातील सात विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. यात सहा मुलींचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंचेरियल जिल्ह्यातील तंदूर येथे १६ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची पहिली घटना घडली. त्यानंतर राज्यभरातून इतर घटना समोर आल्या. (7 students commit suicide in Telangana within few hours)
पोलिसांनी सांगितले की, सदर मृत विद्यार्थी पहिल्या वर्षाच्या चार विषयांमध्ये नापास झाल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
या विद्यार्थ्याच्या व्यतिरिक्त राज्यातील इतर भागातून १६ ते १७ वर्षांदरम्यान वय असलेल्या सहा विद्यार्थीनींनी आत्महत्या केली आहे.
काहींनी गळफास घेतला, काहींनी गावातील विहिरीत उडी घेतली तर काहींनी तलावात उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. हैदराबादच्या नजीक असलेल्या राजेंद्रनगर आणि खम्मम, महबुबाबाद आणि कोल्लूर या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.