नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या एका खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना झारखंड उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. झारखंड उच्च न्यायालयाच्या खासदार-आमदार न्यायालयाकडून याबाबत महत्त्वाची टिप्पणी करण्यात आली आहे.
ज्या ठिकाणी खासदार-आमदार यांच्या घोटाळ्याशी संबंधित किंवा अन्य प्रकरणांशी संबंधित प्रकरणांवर सुनावणी केली जाते, तिथे या राहुल गांधी यांच्या प्रकरणावर सुनावणी झाली आणि त्यांनी राहुल गांधी यांच्यावर सुरू असलेल्या कारवाईला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीच्यादरम्यानच झारखंड उच्च न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी केल्याने नेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एमपी-एमएलए न्यायालयाकडून राहुल गांधी यांच्यावर सुरू असलेल्या मानहानीच्या प्रकरणात कारवाई करण्याला 13 जूनपर्यंत स्थगिती दिली आहे.