नांदेड :- शिंदे-फडणवीस सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना 6 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली अहे. ही मदत खुपच तुटपंजी आहे. तसेच मागच्या वेळेस नांदेडला आलो तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुमच काम तेलंगणात आहे. इकडे का येता? तुम्ही तेलंगणासारख्या सवलती द्या, मी तुमच्या राज्यात पाय ठेवणार नाही, असे थेट आव्हान तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी फडणवीस यांना दिले.
नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे आज बीआरएस पक्षाची जाहीर सभा झाली. यावेळी केसीआर यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. या सभेत माजी आमदार हर्षवर्धन जाधव, माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्यासह अनेक नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला.
चंद्रशेखर राव म्हणाले, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना 6,000 रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला. गेल्या 75 वर्षांत फक्त दोनच पक्षांनी देशावर राज्य केले. तर इतर पक्षांना जवळपास पाच वर्षे सत्ता मिळाली. पण शेतकऱ्यांच्या स्थितीत काही फरक पडलेला दिसत नाही. यापूर्वी तुम्ही तुमची शक्ती दाखवली, तेव्हा राज्यकर्त्यांना माफी मागावी लागली. यासाठी शेतकऱ्यांनी पुन्हा एकत्र यावे.
BJP : सुषमा स्वराज यांच्या कन्याही राजकारणात; दिल्ली भाजपच्या…
देशात 41 कोटी एकर जमीन शेतीसाठी योग्य आहे. मी महाराष्ट्रात एकदाच आलो आणि प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला 6,000 रुपये देण्याची तरतूद महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात आढळून आली. ती यापूर्वी कधीच का करण्यात आली नाही? ही मदत म्हणजे आगीवर पाणी शिंपडण्यासारखे आहे. आम्हाला ते नको आहे. महाराष्ट्र सरकारने प्रति एकर 10,000 रुपये द्यावी, असेही राव म्हणाले.
फरारांवरील टीकेने भाजपला यातना का होतात?- मल्लिकार्जुन खर्गे
तसेच मी फडणवीसांना आवाहन करतो की, त्यांनी शेतकऱ्यांसाठी 24 तास पाणी, मोफत वीज आणि त्यांचे उत्पादन खरेदी करावी. त्यांनी असे केल्यास मी महाराष्ट्रात येणे थांबवतो, असेही तेलंगणाचे मुख्यमंत्री राव म्हणाले.
दरम्यान, बीआरएस पक्षाने महाराष्ट्रात नोंदणी केली आहे. आता बीआरएस राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणणार असल्याची घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची केली. राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद निवडणूक बीआरएस लढवणार असल्याची घोषणा केसीआर यांनी केली आहे.