मुंबई – राज्यात राजकीय उलथा-पालथमध्ये अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांनी राष्ट्रवादीने भाजपासोबत येऊन राज्यात सरकार स्थापन करावे, असे म्हटले होते. त्याचप्रमाणे आज अजित पवार यांनी भाजपला साथ देत उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत. या पार्श्वभूमीवर गद्दारी भाजपने नव्हेतर शिवसेनेने केली असल्याचे नवनीत राणा यांनी म्हंटले आहेत. तसेच अजित पवारांच्या निर्णयात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही सामील असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
नवनीत राणा म्हणाल्या कि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईल हे वाक्य खरे करून दाखवले. तसेच सत्तासमीकरण शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी नाहीतर त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी समीकरण बिघडवले असून भविष्यात १०० टक्के शिवसेना फुटण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. तर याची सुरुवात भाजपने नव्हेतर शिवसेनेचं केली असल्याचे राणा यांनी म्हणाल्या आहेत.
दरम्यान, नवनीत कौर राणा यांनी राष्ट्रवादीने भाजपासोबत येऊन राज्यात सरकार स्थापन करावे, असे म्हटले आहे. याविषयी पत्रकारांनी शरद पवारांना विचारले असता, कोण आहेत नवनीत कौर राणा? त्या आमच्या पार्टीचे धोरण ठरवणार का? असे सांगत शरद पवार यांनी नवनीत कौर राणा यांची शाळा घेतली होती.