कोलकाता – भारत-बांग्लादेशमध्ये आज पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने शतक ठोकल आहे. बांग्लादेशचा पहिला डाव १०६ धावांवर आटोपल्यानंतर भारताने पहिल्या डावात पुजारा-रहाणेच अर्धशतक आणि विराटच्या शतकाच्या जोरावर कसोटी सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे.
20th Test century as Captain of India ✅
27th Test century of his career ✅
70th International century ✅
41st international century as captain (joint-most)✅
1st Indian to hit a century in day/night Test ✅#KingKohli pic.twitter.com/q01OKPauOu— BCCI (@BCCI) November 23, 2019
दरम्यान, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने अर्धशतक झळकावल्यानंतर ते माघारी परतले, मात्र विराटने खेळपट्टीवर स्थिर राहत आपल शतक झळकावल. दिवस-रात्र कसोटी सामन्यात शतक झळकावणारा विराट पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने विराट कोहलीच हे ४१ वे शतक ठरले आहे. या कामगिरीसह विराट कोहलीने माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटींगशी बरोबरी केली आहे.
The #RunMachine at it again ??@imVkohli brings up his 27th Test ?#PinkBallTest #INDvBAN pic.twitter.com/rL4wDIdKsK
— BCCI (@BCCI) November 23, 2019
दरम्यान पहिल्या दिवशी चेतेश्वर पुजाराने अर्धशतक झळकावल्यानंतर, उप-कर्णधार अजिंक्य रहाणेनेही अर्धशतकी खेळी करत विराटला साथ दिली. अजिंक्यने ६९ चेंडूत अजिंक्यची ७ चौकारांसह ५१ धावांची खेळी केली.