मुंबई – शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीमध्येही फुट पडली आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांनी अभिवादन केले. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.
अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत भाजपसोबत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला आणि राज्यातील राजकीय वातावरण चांगलच ढवळून निघालं काल शरद पवार यांनी स्वतः मैदानात उतरणार असल्याचं सांगितलं होत त्यानुसार आज पवारांनी कऱ्हाडमध्ये यशंवतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी विवध प्रश्नांची उत्तरे दिले. यावेळी छगन भुजबळ,वळसे पाटील,सुनील तटकरे असे मातब्बर नेते सोडून गेल्यामुळे वाईट वाटत का ? असं प्रश्न पवारांना विचारला असता पवारांनी एका वाक्यात उत्तर दिल.
मात्तबर नेते सोडून गेल्याच दुःख वाटत का ? असं विचारलं असता शरद पवार म्हणाले,”अजिबात नाही ! मला दुःख वाटत नाही. आजच चित्र काही असेल पण अंतिम निर्णय मतदार देतो मग तो भलेही सहा महिन्यांनी लागेल किंवा वर्षभराने लागेल. माझा विश्वास सामान्य माणसावर आहे असं पवारांनी यावेळी ठणकावून सांगितलं. तसेच कारवाई बाबतचा निर्णय जयंत पाटील घेतील असंही पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा अर्थमंत्री पदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार देखील आता उपमुख्यमंत्री बनले आहे. अजित पवार हे पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहे. यामुळे महाराष्ट्राला पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री लाभले आहेत.