Rahul Gandhi on BJP । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी पुन्हा एकदा भाजप जर सत्ते आले तर ते देशातील संविधान बदलून टाकतील असा आरोप केला आहे. मध्य प्रदेशातील रतलाम येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजप संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा देत आहे. पण भाजप-एनडीएला 150 जागाही मिळणार नसल्याचा दावा राहुल यांनी यावेळी केला.
संविधान बदलण्यासाठी त्यांचा 400 जागांचा नारा Rahul Gandhi on BJP ।
सभेला संबोधित करताना,”ही निवडणूक देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्याची निवडणूक असल्याचे राहुल म्हणाले. एका बाजूला नरेंद्र मोदी आणि आरएसएस आहेत, जे संविधान नष्ट करू पाहत आहेत. त्यासाठी भाजप संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा देत आहे. दुसरीकडे, काँग्रेस पक्ष आणि भारत आघाडी आहे, जी संविधान वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असे त्यांनी म्हटले. भाजपला १५० च्या पुढे एकही जागा मिळणार नाही. तसेच “भाजपच्या लोकांना संविधान रद्द करून गरीब, दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांचे आरक्षण हिसकावून घ्यायचे आहे, मात्र आम्ही आरक्षण कधीच संपू देणार नाही, आरक्षणावरील ५० टक्के मर्यादाही आम्ही हटवणार आहोत.” असे आश्वासन त्यांनी दिले.
“९० अधिकाऱ्यापैकी एकही आदिवासी नाही” Rahul Gandhi on BJP ।
“देशाचे सरकार ९० लोक चालवतात. ९० पैकी एकही अधिकारी आदिवासी समाजातील नाही. मागासवर्गीय लोकसंख्येच्या 50 टक्के आहेत. त्यांच्याकडे फक्त तीन अधिकारी आहेत. दलित-मागास-आदिवासी समाजातील लोक ना मीडियात दिसतील ना हॉस्पिटलमध्ये. ते म्हणाले, “मीडियाचे लोक अंबानीजींचे लग्न दाखवतील, बॉलीवूडच्या बातम्या प्रसारित करतील, पण आदिवासी समाजावर होत असलेल्या अत्याचारावर बोलणार नाहीत, कारण मीडिया आणि व्यवस्थापनात दलित, मागासवर्गीय नाही. देशातील 200 मोठ्या कंपन्या आणि आदिवासी समाजाशी संबंधित नाही.