राजगुरूनगर (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या दिवशी प्रती पंढरपूर असलेल्या कडुस गावामध्ये गोहत्या होते हा देशाचा अपमान आहे. अशा विघातक शक्तींवर सरकारने वेळीच निर्बंध आणावेत. म्हणून मोर्चे आंदोलन केले जात आहे. लव्ह जिहाद कायदा, गोहत्या बंदी कायदा, समान नागरी कायदा करून त्याची कठोर अमलबजावणी करावी. असे प्रतिपादन अखिल भारतीय विश्व हिंदू परिषदचे सह मंत्री शंकर गायकर यांनी राजगुरूनगर येथे केले.
आषाढी एकादशीच्या दिवशी प्रती पंढरपूर कडुस गावात तीन गायींची कत्तल झाल्याच्या निषेधार्थ व लव्ह जिहाद कायदा, गोहत्या बंदी कायदा, समान नागरी कायदा व्हावा या मागणीसाठी राजगुरूनगर शहरात आज उत्स्फूर्त कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी अकरा नंतर राजगुरूनगर शहरातून बजरंग दल, विश्र्वहिंदू परिषद व सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला.
मोर्चाचे रूपांतर नंतर सभेत झाले. यावेळी मातृ शक्ती संघटना मृणाली पडवळ, संतोष खामकर, संदेश भेगडे, शिवसेनेच्या महिला संघटक विजया शिंदे, तालुका प्रमुख रामदास धनवटे, माजी जि प माजी सदस्य बाबाजी काळे, पस माजी संभापती अंकुश राक्षे, भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष सुरेश कौदरे, निलेश आंधळे, सागर सातकर,
विश्व हिंदू परिषद खेड तालुका अध्यक्ष वीरेंद्र भागवत, मनोहर सांडभोर, मंगेश गुंडाळ, राम खेडकर, राहुल पिंगळे, शंकर राक्षे, सोपान डुंबरे, महेंद्र असावले, अजय शिंदे, नरेश हेडा, यांच्यासह बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचे युवक युवती नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी सकल हिंदू मोर्चाला मार्गदर्शन करताना अखिल भारतीय विश्व हिंदू परिषद चे सह मंत्री शंकर गायकर म्हणाले, आपला हक्क मागण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. देशभर लव्ह जिहाद गोहत्या बंदी व समान नागरी कायदा व्हावा यासाठी मोर्चे काढले जात असून सरकारला जागे केले जात आहे भारताच्या गल्ली बोळात आपल्या आजूबाजूला लव्ह जिहाद, गोहत्या होतात असे दृश्य पाहायला मिळत आहे. अशा शकित्वर सरकारने तत्परतेने निर्बंध आणावेत म्हणून मोर्चे आंदोलन केले जात आहे. सरकारला अनेक विनंत्या केल्या मात्र त्यांनी कानात बोळे घातले आहेत लवकरच यावर निर्णय झाला नाही तर त्याचे तीव्र पडसाद पाहायला मिळतील.
सरकारला आम्ही आवाहन करतो ज्यांनी गोमातेचा अपमान केला त्यांचे सरकार दुबळे आहे. त्यांचे अस्तित्व संपले आहे. “गाय वासरू नका विसरु”हे ब्रीद वाक्य हे सरकार विसरले आहे. ज्यांनी गोमतेचा, संतांचा अपमान केला त्यांचा वंश बुडाला आहे. कायद्याची भीती आम्हाला नाही. गायीसाठी आणि आईसाठी खानदान उखडून टाकू अशी ताकद आमच्यात आहे.
इंदिरा गांधी राजीव गांधी मेले त्यांना गोमातेचा शाप होता.असेही त्यांनी नमूद केले डोक्यातलं भगव वादळ अंतकरणात उतरवा. हा सतेचा लढा आहे सत्याची जित झाली पाहिजे यासाठी हा लढा, मोर्चा आहे गोमाता, मंदिरे यांची जोपासना आपण केली पाहिजे. यावेळी मोर्चेकऱ्यांनी मागणीचे निवेदन अप्पर तहसीलदार डॉ. नेहा शिंदे यांना देण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार मदन जोगदंड, पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे उपस्थित होते.