मुंबई – उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या अजित पवार यांनी आज आपला पदभार स्विकारला आहे. त्यामुळे त्यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये परत येण्याच्या आशा पुर्णपणे मावळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शायरीच्या माध्यमातून अजित परावांवर निशाणा साधला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले कि, मेरा साया भी बडा नमक हराम निकला! दिन मे मेरे साथ था… रात मे कहीं ओर से निकला!!!, अशी अप्रत्यक्ष टीका त्यांनी अजित पवारांवर केली आहे.
मेरा साया भी बडा नमक हराम निकला !
दिन मे मेरे साथ था…
रात मे कहीं ओर से निकला !!!— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 25, 2019
दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस यांचे राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी बंडखोरी करीत आपल्या आमदारांच्या सह्यांचे पत्र भाजपाला दिले. या पत्राच्या आधारे भाजपाने शुक्रवारी रातोरात हालचाली करीत शनिवारी सकाळी राजभनवर शपथविधी उरकून घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या अनपेक्षित घडामोडीमुळे राज्यात खळबळ तर उडालीच पण शिवसेना व दोन्ही कॉंग्रेसला मोठा धक्का बसला.