नवी दिल्ली – दिल्लीत लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. पक्षाचे माजी अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांच्यासह पाच काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लवली यांच्याशिवाय राजकुमार चौहान, नीरज बसोया, अमित मलिक आणि नसीब सिंह यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्वांचा दिल्ली प्रदेश वीरेंद्र सचदेवा यांनी आज भाजप मुख्यालयात पक्षात समावेश केला. 28 एप्रिल रोजीच लवली यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लव्हली यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मला भाजपचे आभार मानायचे आहेत, आम्ही हरवलेल्या अवस्थेत भटकत असताना पक्षाने आम्हाला साथ दिली. दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही जे काही करू शकतो ते करू. मोदींचे हात आणखी बळकट करण्यासाठी आम्ही काम करू.
अरविंदर सिंग लवली हे दिल्लीत आम आदमी पार्टीसोबतच्या युतीच्या विरोधात होते. याशिवाय राजकुमार चौहान यांना उत्तर-पश्चिम दिल्लीतून तिकीट न मिळाल्यानेही ते नाराज होते. लवली यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून त्यांच्या नाराजीचे कारण स्पष्ट करत राजीनामा पत्र पाठवले होते.