मुंबई : कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने 162 आमदारांच्या पाठींब्याचे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले, अशी माहिती शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली.
शिंदे म्हणाले, आम्ही 162 आमदारांचा पाठींबा असल्याचे पत्र राज्यपांना दिले आहे. लोकशाहीमध्ये केवळ बहुमताच्या आकड्याला महत्व आहे. अल्पमातात असणाऱ्या देवेंद्र फडणवीस सरकारने राजीनामा द्यायला हवा. कारण ते बहुमत सिध्द करू शकणार नाहीत. ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांना संधी द्यायला हवी.
फडणवीस सरकारने बहुमत चाचणी घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केली. भाजपाकडे बहुमत नाही,असा दावा करून शरद पवार म्हणाले, भाजपाकडे बहुमत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच त्यांनी सरकार स्थापन केले नाही. सुरवातीला त्यांनी राज्यपालांना तसे लेखी कळवलेही होते. अजित पवार यांना पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय पक्ष घेईल.
सध्याचे राज्यातील सरकार बनावट कागदपत्रे आणि दस्तऐवजाच्या जोरावर निर्माण झाले आहे. सकाळी दहा वाजता शिंदे, थोरात, चव्हाण, विनायक राऊत, आझमी , के. सी पडवी आणि मी अशा शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतलीाहे, अशी पुस्ती त्यांनी जोडली.