नवी दिल्ली – देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली असून, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे महाराष्ट्राला आठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राला वेळेत पुरवठा न झाल्यास तीन दिवसांमध्ये लसीकरण बंद पडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. सध्या लसीकरणावरून राज्य आणि केंद्र सरकार कलगीतुरा रंगला आहे.
चिंताजनक! महाराष्ट्रातील ‘या’ तीन जिल्ह्यात लसीकरण ठप्प
यातच वृत्त माध्यमांशी बोलतांना लसीकरणावरून योगगुरू बाबा रामदेव यांनी संवाद साधला. ते म्हणाले,’सध्या लस आणि लसीकरणावरून अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहे. भारतात अशा अनेक केसेस समोर आल्या आहे जात कोरोनाची लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाली आहे. तर अनेकांना एकदा कोरोना झाला होता त्यांना सहा महिन्यात पुन्हा झाला. त्यामुळं , ‘मी लसीकरणाचा विरोधक नाही, पण योग, प्राणायम केल्यानं इम्युनिटी वाढते ‘ असं मत त्यांनी मांडले.
दरम्यानं, मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश जावडेकर यांनी तीन लाख लसीकरण करत असताना सहा लाख करण्यास सांगितलं. केंद्र सरकारकडून डोस पुरवले जातील असं सांगण्यात आलं. आम्ही साडे चार लाखांपर्यंत पोहोचलो असून लवकरच सहा लाखांपर्यंत जाऊ. पण साडे चार लाखांमध्येच लस नाही म्हणून केंद्र बंद ठेवावं लागत आहेत. लोक तिथे येत असून आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस नाही असं सांगण्याची वेळ आली आहे. या सर्व गोष्टीला लसीचा न होणारा पुरवठा कारणीभूत आहे,” अशी खंत राजेश टोपे यांनी व्यक्त केली.