मुंबई – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे महाराष्ट्राला आठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राला वेळेत पुरवठा न झाल्यास तीन दिवसांमध्ये लसीकरण बंद पडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
#Maharashtra | Vaccination drive temporarily halted in all government and private inoculation centres in Panvel, due to unavailability of #COVID19 vaccines. Centres will be reopened once vaccines are back in stock: Panvel Municipal Corporation pic.twitter.com/CSo3uPrkAL
— ANI (@ANI) April 7, 2021
यातच लसीचा तुटवडा जाणवत असल्याने पनवेलमध्ये तर लसीकरण पूर्णतः ठप्प झालं आहे. पुढील लस उपलब्ध होईपर्यंत सर्व शासकीय आणि खाजगी लसीकरण केंद्रामध्ये लसीकरण बंद करण्याचा निर्णय पनवेल महानगरपालिकेने घेतला आहे.
पनवेल महानगरपालिकाने लसींचा तुटवडा असल्याकारणाने पुढील लस उपलब्ध होईपर्यंत सर्व शासकीय आणि खाजगी लसीकरण केंद्रामध्ये लसीकरण कार्यक्रम बंद राहणार आहे, अशी माहिती पनवेल महानगरपालिकेकडून देण्यात आली. लसतुटवड्यामुळे पनवेलसोबतच सांगली, साताऱ्यातही लसीकरण ठप्प झाले आहे.
दरम्यान, मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबद्दल माहिती दिली.“प्रकाश जावडेकर यांनी तीन लाख लसीकरण करत असताना सहा लाख करण्यास सांगितलं. केंद्र सरकारकडून डोस पुरवले जातील असं सांगण्यात आलं. आम्ही साडे चार लाखांपर्यंत पोहोचलो असून लवकरच सहा लाखांपर्यंत जाऊ. पण साडे चार लाखांमध्येच लस नाही म्हणून केंद्र बंद ठेवावं लागत आहेत. लोक तिथे येत असून आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस नाही असं सांगण्याची वेळ आली आहे. या सर्व गोष्टीला लसीचा न होणारा पुरवठा कारणीभूत आहे,” अशी खंत राजेश टोपे यांनी व्यक्त केली.