मुंबई: राज्यातल्या सत्तेचा तिढा अधिकधिक गुंतागुंतीचा होत चालला आहे. भाजप नंतर शिवसेना देखील सरकार स्थापन करण्यास असमर्थ ठरली आहे. त्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तिसऱ्या क्रमांकाचे बहुमत असलेल्या राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे. राज्यपालांच्या अमंत्रणानंतर राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने राजभावणावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली आहे.
दरम्यान राज्यपालांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की,राज्यपालांनी आम्हाला उद्या सायंकाळी 8: 30 पर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे आम्ही काँग्रेसच्या नेत्यांशी बैठक करून आमचा निर्णय कळवू. तसेच आम्ही पुन्हा येऊ आशे आश्वासन राज्यपालांना दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे सन्माननीय राज्यपाल @BSKoshyari यांनी सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते @AjitPawarSpeaks व प्रदेशाध्यक्ष @Jayant_R_Patil यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळासह त्यांची राजभवन येथे भेट घेतली. pic.twitter.com/gTWTO9psQJ
— NCP (@NCPspeaks) November 11, 2019