मुंबई – गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रणौत व शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यादरम्यान ट्विटर वॉर रंगलं आहे. कंगनाने मुंबईबाबत केलेल्या विधानावरून राऊत यांनी तिचा उल्लेख ‘हरामखोर’ असा केल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका सुरु आहे. राऊत यांच्या वक्तव्यावरून वादंग सुरु असतानाच शिवसेनेकडून त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
राज्यसभा खासदार संजय राऊत हे आता शिवसेनेचे मुख्य प्रवक्ता म्हणून काम पाहणार आहेत. याबाबतची माहिती शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून देण्यात आली आहे.
रिया चक्रवर्तीला अटक; एनसीबीची कारवाई
याखेरीज लोकसभा सदस्य अरविंद सावंत व धैर्यशील माने, राज्यसभा सदस्य प्रियंका चतुर्वेदी, मंत्री उदय सामंत, अनिल परब, गुलाबराव पाटिल, आमदार सुनील प्रभु व प्रताप सरनाईक, मुंबईच्या महापौर किशोरी पेडनेकर व जेष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यावरही पक्ष प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
संजय राऊत हे पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांच्या टीमचे कॅप्टन अर्थात मुख्य प्रवक्ते म्हणून काम पाहणार आहेत.
काय म्हणाली होती कंगना?
अभिनेत्री कंगना रणौतने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्याला मुंबई शहरात न परतण्याची धमकी दिली असा आरोप करत “याआधी मुंबईच्या रस्त्यांवर आझादीची मागणी करणारे ग्रॅफिटी दिसत होते आणि आता मला उघड धमक्या दिल्या जात आहेत. मुंबई मला पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?” असं ट्विट केलं होत.
तुमची रोग प्रतिकारकशक्ती मजबूत आहे की कमजोर? जाणून घ्या…