Kangana Ranaut On Bollywood। बॉलिवूडची क्वीन कंगना राणावत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपची उमेदवार आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी येथून तिला पक्षाने तिकीट दिले आहे. मंडीची लेक कंगना सध्या जोरदार प्रचारात व्यस्त आहे. या निवडणुकीत त्यांचा विजय होईल, असा विश्वास तिला आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना कंगणाने मोठी घोषणा केलीय.
राजकारणासाठी बॉलिवूड सोडणार का? Kangana Ranaut On Bollywood।
वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगणाने अनेक विषयावर भाष्य केले. कंगनाला विचारण्यात आले – ती चित्रपट आणि राजकारण कसे सांभाळेल? यावर अभिनेत्री म्हणाली, ‘मी चित्रपटात अभिनयही करते, भूमिकाही करते आणि दिग्दर्शनही करते. “यंदाच्या निवडणुकीत मला यश मिळाले आणि जर लोक माझ्याशी आणखी मोठ्या प्रमाणात जोडले गेले तर मी अभिनय क्षेत्र सोडू शकते” अशी मोठी घोषणा कंगणाने यावेळी केली.
मंडीतून जिंकले तरच राजकारण करेन Kangana Ranaut On Bollywood।
“जर मला वाटले की लोकांना माझी गरज आहे तर मी त्या दिशेने जाईन. मंडीतून जिंकले तरच राजकारण करेन. अनेक चित्रपट निर्माते मला राजकारणात जाऊ नका असे सांगतात. पण जर आता मला लोकांशी जोडण्याची संधी मिळाली तर मी ती देखील स्वीकारेन. मला वाटतं, लोकांच्या तुमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत, त्याबद्दल तुम्ही आधी न्याय केला पाहिजे.” असे कंगणा यावेळी म्हणाली.
राजकारण -चित्रपट जगतात काय फरक आहे?
अभिनेत्रीला विचारण्यात आले की, राजकारणाचे जीवन चित्रपटांपेक्षा पूर्णपणे वेगळे असते. हे सर्व त्यांना सुखावणारे आहे का? त्यावर कंगना म्हणाली- “चित्रपटांचे खोटे जग आहे. त्यातून वेगळे वातावरण तयार होते. लोकांना आकर्षित करण्यासाठी एक बबल तयार केला जातो. पण राजकारण हे वास्तव आहे. मला लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत, मी लोकसेवेत नवीन आहे, खूप काही शिकण्यासारखे आहे.”
कुटुंबवादावर कंगना काय म्हणाली?
कुटुंबवादावर कंगना म्हणाली,”हे स्वाभाविक आहे. मला वाटतं कुठेतरी आपला परिवारवाद चित्रपट आणि राजकारणापुरता मर्यादित आहे. नेपोटिझम ही प्रत्येकाची समस्या आहे आणि असावी. जगात याला अंत नाही. स्नेहातून बाहेर पडावे लागेल. जोपर्यंत आपण स्वतःचा विस्तार करतो तो म्हणजे कुटुंब. आज ते मला मंडीची मुलगी म्हणतात. हे माझे कुटुंब आहे.”