पिंपरी – वाढत्या “करोना’च्या संसर्गाला वेसण घालण्यासाठी ग्रामीण भागातही वेगवेगळी पाऊल टाकले जात आहे. सांगवडे दारुंबरे गावपुढाऱ्यांनी शक्कल लढविली आहे. परगावहून येणाऱ्यांना पै-पाहुण्यांना, नागरिकांना “नो-एण्ट्री’ अर्थातच गावबंदी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना उपाययोजना म्हणून परिसरात येणाऱ्या नागरिकांना गावच्या प्रवेशद्वार जवळच नाकाबंदी करून यापासून सुटका व्हावी यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यासाठी कंबर कसली आहे. यामधून जीवनावश्यक वस्तुंना सूट देण्यात आली आहे.