Bhai Jagtap : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यानंतर काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यावर मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांना खुलासा करावा लागला आहे. ट्विटद्वारे त्यांनी ‘माझी शेवटची शोभा यात्रा काँग्रेस पक्षाच्या तिरंग्या झेंड्यातूनच निघेल,’ असे स्पष्टपणे सांगितले.
भाई जगताप ट्विट
भाई जगताप यांनी ट्विट करत लिहिले की, “भाई जगताप काँग्रेस सोडणार अश्या वावड्या काही नतद्रष्ट पसरवत आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की माझ्या विद्यार्थी दशेपासून खांद्यावर घेतलेला हा काँग्रेस चा तिरंगा मी कधीही खाली ठेवणार नाही. पद, लालच आणि फायद्याकरिता माझा पिंड बनलेला नाही आणि मी कोणाच्या बापाला घाबरतही नाही. अनेक वादळ आली आणि गेली, काँग्रेस कोणीही संपवू शकलं नाही आणि कोणाच्याने संपणार ही नाही. काँग्रेस पक्षाला गतवैभव पुन्हा मिळवून देऊ त्याकरिता प्रचंड कष्ट घेऊ! माझी शेवटची शोभा यात्रा काँग्रेस पक्षाच्या तिरंग्या झेंड्यातूनच निघेल याची सर्वांनी खात्री बाळगा!”
भाई जगताप काँग्रेस सोडणार अश्या वावड्या काही नतद्रष्ट पसरवत आहेत…
मी त्यांना सांगू इच्छितो की माझ्या विद्यार्थी दशेपासून खांद्यावर घेतलेला हा काँग्रेस चा तिरंगा मी कधीही खाली ठेवणार नाही..
पद, लालच आणि फायद्याकरिता माझा पिंड बनलेला नाही.. आणि मी कोणाच्या बापाला घाबरतही…
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) February 12, 2024
दुसरीकडे, पलूस कडेगावचे आमदार विश्वजीत कदम यांना सुद्धा खुलासा करण्याची वेळ आली. त्यांनी अजूनही काँग्रेस सोबत असल्याचे सांगत काठावर असल्याचे स्पष्ट केलं आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ आणखी काही नेते कॉंग्रेसचा हात सोडणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
हेही वाचा:
“कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे”
शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील फुटीमुळे राज्यात सातत्याने राजकीय उलथापालथी सुरू आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर कॉंग्रेस राज्यातील सर्वांत मोठा विरोधी पक्ष बनला. कॉंग्रेसजनांकडून पक्षातील एकजुटीला तडा जाणार नाही, असे चित्र रंगवले जात होते. मात्र, त्या पक्षातूनही आऊटगोईंगचे सत्र सुरू झाले आहे.
महिनाभरात कॉंग्रेसमधून तीन नेते बाहेर
महिनाभराच्या कालावधीत कॉंग्रेसमधून तीन नेते बाहेर पडले आहेत. सर्वांत आधी मागील महिन्यात माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकला. त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ मुंबईतील आणखी एक नेते बाबा सिद्दीकी यांनी कॉंग्रेसशी फारकत घेतली. ते राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे भाग बनले. आता चव्हाण यांच्या रूपाने कॉंग्रेसला आणखी मोठा हादरा बसला आहे.
हेही वाचा: