Eknath Shinde On Rahul Gandhi| लोकसभा निवडणुकीचे मतदान सात टप्प्यात पार पडणार आहेत. यानिमित्त नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात दोन दिवसांत सहा सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
आज 30 एप्रिल रोजी नरेंद्र मोदी यांची माढा, धाराशिवमध्ये आणि लातूरमध्ये सभा होणार आहे. यानिमित्त आता मोदी लातूरमध्ये सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ दाखल झाले आहेत. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणादरम्यान कॉँग्रेससह राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला.
एकनाथ शिंदे म्हणाले की, “कॉँग्रेसने देशभरात भ्रष्टाचाराचा पॅटर्न सेट केला होता. कॉँग्रेसने गरीबी हटावचा नारा दिला, पण खरी गरीबी हटावण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर आली आहे. आता तिसऱ्या स्थानावर येण्याचा निर्धार मोदींनी केला आहे.”
“कॉँग्रेसचा पारंपारिक गड 10 वर्षांपूर्वीच ढासळला. कॉँग्रेसकडे रोडवर फिरुनही लॉन्च न होणारा नेता आहे, चंद्रयान लॉन्च झालं पण राहुल गांधी लॉन्च होऊ शकले नाही,” असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
हेही वाचा:
PM मोदीं लगावले गंभीर आरोप, ‘काँग्रेस सरकार शेतकऱ्याच्या वाटायचे पैसे पळवायचे’