मुंबई – आज महात्मा गांधी असते तर… आज महात्मा गांधी असायला हवे होते, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हंटले आहे. महात्मा गांधी यांना १५० व्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी ट्विटरद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. यासोबतच देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनाही आदरांजली वाहिली आहे.
महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहताना राज ठाकरे म्हणाले कि, आज महात्मा गांधी असते तर… आज महात्मा गांधी असायला हवे होते…’ असं प्रत्येक भारतीयाला गेली ७ दशकं वाटत राहिलं ह्यातच गांधीजींच्या शिकवणुकीची आणि योगदानाची ताकद दिसून येते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. यासोबतच त्यांनी महात्मा गांधींचा फोटोही शेअर केला आहे.
‘आज महात्मा गांधी असते तर… आज महात्मा गांधी असायला हवे होते… ‘ असं प्रत्येक भारतीयाला गेली ७ दशकं वाटत राहिलं ह्यातच गांधींजींच्या शिकवणुकीची आणि योगदानाची ताकद दिसून येते. महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. pic.twitter.com/fYiXzpoqhD
— Raj Thackeray (@RajThackeray) October 2, 2019
‘महान स्वातंत्र्यसैनिक व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना विनम्र अभिवादन, असे ट्विट करत लाल बहादूर शास्त्रींना आदरांजली अर्पण केली.
Remembering the great freedom fighter and our former Prime Minister, Shri Lal Bahadur Shastri ji on his birth anniversary. The Maharashtra Navnirman Sena humbly pays its homage to this remarkable leader. #LalBahadurShastriJayanti pic.twitter.com/e2afzHWNHv
— Raj Thackeray (@RajThackeray) October 2, 2019
दरम्यान, महात्मा गांधी यांची जयंती आज देशभरात साजरी केली जात आहे. या निमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे.