मुंबई – महाराष्ट्रात भाजप-अजित पवार सरकार स्थापनेनंतर सर्वात जास्त नाराज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार होते. नवीन सरकार स्थापनेमध्ये पडद्यामागील त्याची काही योजना होती का?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. अनेक कयास लावण्यात आले. मात्र,राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याने महाराष्ट्राचे राजकारणात पुन्हा एकदा ढवळून निघाले. आणि भाजपचे सरकार अवघ्या चार दिवसातच कोसळले. ही सर्व खेळी शरद पवारांचीच असल्याची चर्चा आहे. या चर्चांना अप्रत्यक्ष दुजोरा अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या नावाने असलेल्या एका फेसबुक पेजवर देण्यात आलेले आहे.
जय पवार यांच्या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे की, “दिलेरखानाच्या गोटात छत्रपती संभाजी महाराज गेले नव्हते तर त्यांना पाठवण्यात आलं होतं’. यासोबतच शरद पवार आणि अजित पवार यांचा फोटो शेअर करण्यात आलेला आहे.
दरम्यान, मी राष्ट्रवादीतच होतो, आहे आणि राहणार, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. नवनविर्वाचित आमदारांचा शपथविधी आज पार पडणार असून त्यासाठी सर्वा अजित पवार विधानभवनात दाखल झाले आहेत.