इस्लामाबाद – पाकिस्तानातील एक इस्लामिक स्कॉलर तारिक मसूद यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपले लग्न झाले नाही असे ते सांगताना दिसत आहेत. भारताचा व्हिसा न मिळाल्यामुळे आपले लग्न होता होता राहीले असा दावा त्यांनी केला आहे. २०१९ मध्ये आपल्याला व्हिसा मिळण्याची अपेक्षा होती, तथापि, तेंव्हा मोदी पुन्हा सत्तेत आले. तारिक मसूद यांचे आतापर्यंत चार विवाह झाले असून जास्तीत जास्त लग्ने करण्यास आणि मुले जन्माला घालण्यास प्रोत्साहन देणारी व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
तारिक व्हिडिओत म्हणतात की त्यांचे लग्न होणार होते. मात्र पुन्हा मोदींचेच सरकार आले. त्यांना व्हिसा मिळाला नाही. ही जुनी गोष्ट आहे. तेंव्हा मोदी यांचे सरकार नुकतेच आले होते. तेंव्हा असा विचार केला की २०१९ ची निवडणूक होऊन जाऊ द्या त्यानंतर पुढचे बघू. मात्र पुन्हा मोदीच जिंकले. माझे लग्न मोडण्यास तेच जबाबदार आहेत. १० वर्षे कोण वाट पाहणार आणि पुन्हा मोदीच सत्तेत आले तर काय करायचे? आपण एवढी वाट पाहू शकत नाही. आपण असे लग्न करतो की लगेच विदाई होते.
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) April 28, 2024
तारिक मसूद यांनी पूर्वी भारताची स्टार टेनीस खेळाडू सानिया मिर्झा आणि तिचा पाकिस्तानी पती शोएब मलिक यांच्याबाबतही विधान दिले आहे. या दोघांचा २०१० मध्ये विवाह झाला होता व याच वर्षात घटस्फोट झाला आहे. त्यासंदर्भात तारिक म्हणाले होते कधी पती-पत्नीचे जमते, कधी नाही जमत. पटत नाही तेंव्हा घटस्फोट घेतात. त्यावर एवढा गदारोळ करण्याची काय गरज आहे. असे वाटते आहे की जणू भारत आणि पाकिस्तानचे युध्दच सुरू झाले आहे.
दरम्यान, पाकिस्तानी यूट्युबर हाफिज अहमद याला दिलेल्या मुलाखतीत तारिक मसूद यांनी सांगितले होते की त्यांचे चार विवाह झाले असून त्यांना १६ मुले आहेत. सगळे वेगवेगळ्या घरांत राहतात. चारही पत्नींशी चांगले संबंध आहेत का असे विचारल्यावर पहिल्या पत्नीशी जुळवून घेण्यास खूप त्रास झाला. बराच काळ टेन्शनमध्ये गेला असे उत्तर त्यांनी दिले होते.