हैदराबाद – हैदराबादमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी उत्तर प्रदेशचे निवडणूक कर्मचारी नियुक्त केले जावेत. अन्यथा इथे असदुद्दीन ओवेसी गडबड करु शकतात. असे केवळ माझेच नव्हे तर अनेकांचे म्हणणे आहे, असे प्रतिपादन हैदराबादच्या भाजपा उमेदवार माधवी लता यांनी म्हटले आहे. (“Asaduddin Owaisi can do something wrong” – Madhavi Latha)
भाजपच्या उमेदवार म्हणून माधवी लता चार वेळचे अनुभवी खासदार आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांना आव्हान देत आहेत. त्या राजकारणात नवीन आहेत, पण निवडणूक रणनीती आखण्यात अतिशय निपुण आहेत. बंजारा हिल्स निवडणूक कार्यालयात माध्यम प्रतिनिधींशी माधवी लता यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली.
माधवी लता म्हणतात की, हैद्राबादमध्ये समाजसेवा करताना आपण फक्त गरिबीच पाहिली नाही, तर बरेच काही पाहिले आहे.चार दशके राज्य करणाऱ्यांनी गरिबांचा अन्यायकारक फायदा घेतला. राजकारणात लोक पैसे खातात आणि सामान्य माणसे गरीबच राहतात. पण खरा मुद्दा लोकांना भडकवून चुकीच्या दिशेने नेण्याचा आहे. धर्माच्या गप्पा मारून धार्मिक लोकांच्या प्रगतीसाठी कोणतेही काम करू नका. त्यांचे स्वतःचे पसमंडा मुसलमानही आमच्या विरोधकांबाबत नाखूष आहेत.
ओवेसींसारख्या दिग्गज उमेदवाराविरोधात लढताना भीती वाटत नाही का, यावर माधवी लता म्हणाल्या की, मी कधीच भीती पाहिली नाही. सत्याशी लढणाऱ्याला घाबरण्याचे कारण नाही. माझ्या मते, ओवेसी यांनीच आता घाबरायला हवे आहे, कारण आजपर्यंत त्यांचे सत्य उघड करायला कोणी आलेले नव्हते. सध्या आपल्या मनात एकच मुद्दा आहे की असदुद्दीन ओवेसींना नामोहरम करायचे. त्यासाठी मतदारसंघातील महिला, पसमांदा मुस्लिम आणि दलितांसाठी काम करावं लागेल. याशिवाय खुद्द पंतप्रधान मोदी सभा घ्यायला येणार आहेत.
आमच्याकडे ओवेसींएवढे पैसे नाहीत, असे सांगून माधवी लता म्हणाल्या की, त्यांनी वक्फ बोर्डाची जमीन चोरलेली आहे. त्यांच्याकडे लंडनमध्ये पाच हजार कोटींचे घर आहे. आम्ही लोकांना प्रेमाने बोलावू, ते येतील. आम्ही २० वर्षे त्यांची सेवा केली आहे.