मुंबई: गेल्या काही काळापासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेक मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातच आता केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामात शिवसैनिक खोडा घालत असल्याबाबत पत्र लिहिल्याने भर पडली आहे. यानंतर आता शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या कार्यालयातून ७ कोटींची कॅश चोरीला गेल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. यावरून भाजपच्या एका नेत्याने टीकास्त्र सोडले आहे.
भावना ताई, ७ कोटींची कॅश आली कुठून, असा मार्मिक सवाल केला आहे. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी वाशिम पोलिस ठाण्यात कार्यालयातून ७ कोटी रुपयांची रक्कम पहाटे ५ वाजता चोरीला गेल्याची तक्रार केली. यानंतर पोलिसांनी प्राथमिक माहिती अहवालाची नोंद केली. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत असून, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांच्यावर थेट सवाल करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
खासदार भावना गवळी यांचा कार्यालयातून पहाटे 5 वाजता ₹7 कोटी रोख नगदी चोरी?
शिवसेना भावना गवळी त्यांचा कार्यालयातून, त्यांचा उपस्थितीत 7/7/2019 रोजी सकाळी 5 वाजता ₹7 कोटी नगदी रोख, ११ लोकांनी चोरले, अशी तक्रार १२/५/२०२० रोजी वाशीम पोलीस ठाण्यात केली
एवढी रोख रक्कम आली कुठून? pic.twitter.com/0nBngqhWrx
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 16, 2021
खासदार भावना गवळी यांचा कार्यालयातून पहाटे ५ वाजता ₹ ७ कोटी रोख नगदी चोरी? शिवसेना भावना गवळी त्यांचा कार्यालयातून, त्यांचा उपस्थितीत ७/७/२०१९ रोजी सकाळी ५ वाजता ₹ ७ कोटी नगदी रोख, ११ लोकांनी चोरले, अशी तक्रार १२/५/२०२० रोजी वाशीम पोलीस ठाण्यात केली.
एवढी रोख रक्कम आली कुठून?, असा मार्मिक सवाल ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. दरम्यान, जुलै २०१९ मध्ये झालेल्या ७ कोटीच्या रोख रकमेच्या चोरीची तक्रार मे २०२० मध्ये पोलीस ठाण्यात नोंदवली गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.