Nirmala Sitharaman | आतापर्यंत सरकारची सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मायनिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया ही कंपनी नोटा आणि नाणी तयार करण्याचे काम करत होती. मात्र आता भारत डिजिटल व्यवहारात आगेकूच करीत आहे. अशा परिस्थितीत नोटा छापण्याचे आणि नाणी तयार करण्याचे काम कमी होणार आहे. त्यामुळे या कंपनीने आगामी काळात स्वतःची भूमिका ठरविण्यासाठी आत्मपरीक्षण करावे असा सल्ला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या कंपनीला दिला आहे.
आज या कंपनीच्या स्थापना दिनानिमित्त अर्थमंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या की. या कंपनीचा मूळ उद्योग बदलत आहे. त्यामुळे आगामी काळात काय करायचे या संदर्भात या कंपनीने विचार करण्याची गरज आहे. सध्या नाणी कमी प्रमाणात तयार केली जात आहेत. आता एखाद्या प्रसंगाला अनुरूप असे नाणे सध्या तयार करण्यात येत आहे.
Japan and UK Face Recession : उत्पादकता कोसळल्याने जपान आणि ब्रिटनमध्ये मंदी…
सध्या ही कंपनी जप्त केलेले सोने शुद्ध करण्याच्या कामात व्यस्त आहे. 2022-23 मध्ये या कंपनीने 5,300 किलो सोन्याचे शुद्धीकरण केले. त्याचबरोबर नफा कमवून केंद्र सरकारला 533 कोटी रुपयांचा लाभांश दिला. सध्या ही कंपनी पासपोर्ट छापने, त्याचबरोबर स्टॅम्प पेपर छापण्याचेही काम करीत आहे. मात्र आगामी काळात अस्तित्वात राहण्यासाठी एवढे काम पुरेसे होणार आहे.
Stock Market | सलग तिसर्या दिवशी शेअर निर्देशांकात भरीव वाढ, ‘या’ कंपन्यांना झाला फायदा….
त्यासाठी नवीन काम तयार करावे लागेल. त्यामध्ये ही पासपोर्ट ट्रेकिंग आणि इतर ट्रेकिंग सिस्टमचा समावेश आहे. यामुळे या कंपनीने स्वतःचे आधुनिकीकरण करण्यासाठी उपाययोजना तयार कराव्यात आणि त्याचे प्रकल्प अहवाल केंद्र सरकारकडे सादर करावेत असे सीतारामन यांनी सुचित केले.