Mamata Banerjee | TMC | BJP | Lok Sabha Election 2024 – सीबीआयने संदेशखळी येथून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केल्यानंतर भाजपच्या मेदिनीपूरमधील उमेदवार अग्निमित्रा पॉल यांनी तृणमूल काॅंग्रेसवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासोबतच ममता बॅनर्जी यांना अटक करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जात आहे.
शुक्रवारी राज्यातील लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान, सीबीआय आणि एनएसजी बॉम्ब पथकांनी संदेशखळी आणि उत्तर २४ परगणा जिल्ह्यात छापे टाकले. छाप्यात अबू तालेबच्या घरातून अनेक शस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक टीएमसी नेते हाफझुल खान यांचे नातेवाईक हा शेख शाहजहानचा जवळचा सहकारी असल्याचा आरोप आहे. शेख शाहजहान हा हकालपट्टी करण्यात आलेला सत्ताधारी पक्षाचा बलाढ्य नेता आहे. अग्निमित्रा पॉल यांनी संदेशखळी प्रकरणी तृणमूल आणि ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे.
त्या म्हणाल्या, ममता या कोणत्या प्रकारच्या मुख्यमंत्री आहेत? त्या खुनी, बलात्कारी आणि दहशतवाद्यांची बाजू घेत आहेत. लाच घेणाऱ्यांना वाचवण्यासाठी कोर्टात जात आहे. शेख शहाजहानच्या गुंडाकडून बॉम्ब, आरडीएक्स आणि पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. संदेशखळीसारख्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचला जात आहे का, असा सवाल त्यांनी केला.
अग्निमित्रा पुढे म्हणाल्या की, आमची मागणी आहे की टीएमसीवर बंदी घालावी आणि ममता बॅनर्जी यांना अटक करावी. ही अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे, जिथे खुनी आणि बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्रीच फिरत आहेत. नोकरीत लाच घेणाऱ्याला वाचवण्यासाठी आम्ही न्यायालयात जाणार आहोत. पश्चिम बंगाल दहशतवाद्यांना आश्रय देत आहे.
तृणमूलची कारवाईला हरकत…
शनिवारी सीबीआय आणि नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या बॉम्ब पथकाने संदेशखळी येथे टाकलेल्या छाप्याबद्दल टीएमसीने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. टीएमसीचा आरोप आहे की सीबीआयने छापा टाकण्यापूर्वी राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनाला कारवाईची नोटीस बजावली नाही.
त्यामुळे टीएमसीची मागणी आहे की निवडणूक आयोगाने तात्काळ मार्गदर्शक तत्त्वे जारी करावी, जेणेकरून सीबीआय किंवा इतर कोणत्याही तपास संस्थेने निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करू नये.