नवी दिल्ली – जागतिक बाजारात कमालीची अस्थिर परिस्थिती असली तरी भारताची निर्यात आयातीपेक्षा जास्त वाढत आहे. त्यामुळे व्यापारातील तूट कमी होऊन चालू खात्यावरील तूट आटोक्यात राहण्यास मदत मिळेल असे वाणिज्य सचिव सुनील भारतवाल ( Commerce Secretary Sunil Barthwal ) यांनी सांगितले.
ते म्हणाले की, चालू खात्यावरील तूट नियंत्रणात राहिल्यामुळे रुपयाचे मूल्य स्थिर होण्यास मदत मिळत आहे. वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी महिन्यात निर्यात 3.12 टक्क्यांनी वाढून 36.92 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. त्या तुलनेत आयात तीन टक्क्यांनी वाढून 54.41 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. यामुळे व्यापारातील तूट 17.49 अब्ज डॉलर इतकी मर्यादित राहिली आहे. अशा परिस्थितीत चालू खात्यावरील तूट आणखी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
Ministry of Finance | नोटा छापणार्या कंपनीने आत्मपरीक्षण करावे – अर्थमंत्री सीतारामन
त्या दृष्टिकोनातून सरकार निर्यात वाढविण्यासाठी आणि रुपयाच्या माध्यमातून व्यवहार करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक पातळीवर दोन युद्ध चालू आहेत. त्यामुळे जागतिक व्यापारावर परिणाम होणार आहे. अशा परिस्थितीत भारताची तूट कमी ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.