प्रा. डी. के. वैद्य
अकोले – एकीकडे अँटिजेन टेस्ट… दुसरीकडे स्वाब… तिसरीकडे पॉझिटिव्ह…. तर चौथ्या बाजूला निगेटीव्ह… पेशंट दगावला अशा बऱ्याच… मानसिकदृष्ट्या अस्वस्थ करणाऱ्या बातम्या येवून धडकत आहेत. मात्र अशाही परिस्थितीत अकोले तालुक्यातील 104 गावे मात्र या साथीपासून लाखो मैल दूर आहेत आणि करोना तेथपर्यंत अद्याप पोचलाच नाही, ही समाधानाची बाब आहे. खऱ्या अर्थाने सर्व जिल्ह्यालाच नव्हे, तर राज्याला ही शुभवार्ता ठरावी, अशी घटना आहे.
अकोले तालुक्यात 191 गावे आहेत. त्यापैकी 87 गावांमध्ये करोना आपला खेळ मांडून बसलेला आहे. आणि 104 गावांमध्ये मात्र त्याची शिरकाव करण्याची हिंमत झालेली नाही. कारण त्या ठिकाणच्या ग्रामस्थांनी पाळलेली पथ्ये, घेतलेली दक्षता, काळजी यामुळे या गावांच्या शिवेपासून करोनाला काढता पाय घ्यावा लागला, अशी सुखद घटना तालुक्यात घडावी, यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे.
अकोले तालुक्यात 2 लाख 90 हजार 604 इतकी लोकसंख्या 191 गावांमध्ये राहते. या लोकसंख्येशी तुलना करता आतापर्यंत 1 हजार 453 लोकांपर्यंत करोना आपला फास टाकू शकला. त्यातही 1 हजार 215 रुग्ण बरे होऊन घरी पोहोचले आहेत. हे बरे होण्याचे प्रमाण 83. 62 टक्के इतके आहे. यावरून तालुक्यातील करोनाची प्रसार होण्याची जरी मोठी चर्चा असली, तरीही बरे होण्याचे प्रमाण निश्चितच कौतुकास्पद म्हणावे लागेल. सध्या 218 रुग्ण ठिकठिकाणी उपचार घेत आहेत, तर वीस जणांचा मृत्यू झाला आहे आणि ते प्रमाण 1.65 टक्के इतके आहे.
अकोले तालुक्यात प्रारंभी करोना खूप दूर होता. पण शहरी भागात राहणारे चाकरमाने जसे जसे घरी परतू लागले, तस तसे करोनाचा वानवळा घेवून अकोले तालुक्याच्या सीमेवर आले. आणि पर्यायाने खेडोपाडी असल्याने पुढील तपासासाठी त्यांचा अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद ऍड. पुष्कर सप्रे यांनी केला. त्यावर अंतिम निकाल देताना न्यायालयाने अर्ज नामंजूर केला आहे.
मुळशी तालुक्यातील डोंगरगाव आणि होतले येथील विविध जमीन गटांची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी गोखले यांच्यासह सुजाता फार्म लि. या कंपनीचे संचालक जयंत म्हाळगी आणि सुजाता म्हाळगी या तिघांवर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. जयंत आणि सुजाता म्हाळगी या दोघांना अंतरिम अटकपूर्व मिळाला आहे. त्यांच्यातर्फे ऍड. सुचित मुंदडा काम पाहत आहेत. याप्रकरणी जयंत प्रभाकर बहिरट (वय 57, रा. कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे. या गुन्ह्यात 14 गुंतवणूकदारांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपास करण्याचा आदेश दिला होता.
आरोपींनी मुळशीतील गिरीवनफ नावाचा प्रकल्प सरकारमान्य आहे, असे भासवले. त्या आधारे ग्राहकांना आकर्षित केले व तक्रारदार यांच्यासह 14 जणांची एक कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमुद आहे. विक्रम गोखले यांनी ऍड. ऋषीकेश गानू आणि ऍड. उपेंद्र खरे यांच्यामार्फत गोखले यांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यात मार्चमध्ये यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, मात्र, सरकारी पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यायलायाने अटकपूर्व जामीन फेटाळला
शहरातील 467 व्यापाऱ्यांची केली तपासणी
प्रशासनाने अकोले येथे व्यापारी वर्गासाठी अँटिजेन तपासणी शिबीर घेण्यात आले. त्यासाठी तहसीलदार मुकेश कांबळे, आरोग्याधिकारी डॉ. इंद्रजित गंभीरे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांनी पुढाकार घेतला. या शिबिरात 467 व्यापाऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यात 38 जण बाधित निघाले, तर 88 जणांचा अहवाल येणे बाकी आहे.