मुंबई – राज्यातील राजकारणाने एका रात्रीत अचानक सर्व चित्र बदलले आहे. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार सत्तेत येईल असे वाटत असतानाच आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनामध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रावादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत अजित पवार यांचा निर्णय पक्षाच्या विरोधात आहे असे भाष्य केले असले तरी राजकीय वर्तुळात या नव्या राजकीय समीकरणा मागे शरद पवार यांची खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
तत्पूर्वी, बच्चू कडू यांनी सत्तास्थापनेबाबत प्रतिक्रिया दिली होती की, राजकीय समीकरणं पूर्णत: बदलली आहे. आता नव्या आघाडीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे, मात्र जोपर्यंत शपथविधी होत नाही तोपर्यंत शरद पवार साहेब नक्की काय करतील हे सांगू शकत नाही. पवारसाहेब अजून अजित पवारांनाच नाही समजले तर मला काय समजणार,’ त्यांच्या या विधानामुळे आज राजकीय क्षेत्रासह सोशल माध्यमांमध्येही या नव्या समीकरणाकडे शरद पवारांची खेळी असल्याची चर्चा रंगत आहे.