कोल्हापूर: महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू असताना अचानक शपथविधी सोहळा घेत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. या सर्व सत्तानाट्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी टीका केली आहे.
आजची राजकीय स्थिती पाहता महाराष्ट्राच्या विधिमंडळाची ग्रामपंचायत झाली आहे, आणि मुख्यमंत्र्यांचा सरपंच झाला असल्याचे शेट्टी यांनी म्हटलं आहे. तसंच कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा अस म्हणत, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे की कोणाचा हे समजत नाही. आजची राजकीय स्थिती संतापजनक आहे. मुख्यमंत्री रात्रीची शपथ घेतो हे काय कळत नाही अशा शब्दात शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे.