मुंबई – बाळासाहेबांच्या नावावर ‘कलंक’ असणाऱ्या उद्धव ठाकरेंची ‘देवेंद्र फडणवीस’ हे नाव घेण्याची लायकी नाही ! कुठे महाराष्ट्राचा ‘कोहिनूर’ आणि कुठे वांद्र्याची ‘घाण’.. अशी जहरी टीका भाजप आध्यत्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. तसेच फेसबूकवर तुषार भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांची आता पर्यंतची कारकीर्द शेअर करत उद्धव ठाकरे यांना राजकारणात सर्व काही वडिलांमुळे मिळाले आहे असेही त्यांनी नमूद केले आहे,
दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सध्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु असल्याचे दिसत आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या सभेत फडणवीस यांच्या भाषणाची एक क्लिप ऐकवली आणि त्यांचा उल्लेख ‘नागपूरचा कलंक’ असा केला.
या टीकेचा पलटवार करत देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप ट्वीट केली आणि आठ मुद्द्यांमध्ये त्यांना उत्तर दिलं आहे. परंतु, आता भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेवर सडेतोड उत्तर दिले आहे.