नवी दिल्ली – ‘भारताचं सामर्थ्य दिवसेंदिवस वाढतं आहे. जगाचा देशावर विश्वास वाढतो आहे. G20 परिषदेचं यजमानपद आपल्याला मिळालं आहे. मागच्या वर्षभरापासून विविध आयोजनं करण्यात आली. या कार्यक्रमांनी सामान्य माणसाचं सामर्थ्य काय आहे ते जगाला दाखवलं आहे. भारतात किती विविधता आहे ते दाखवून दिलं आहे. अशा कार्यक्रमांमुळे जगाला भारत काय आहे ते जाणून घ्यायचं आहे.’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरील संबोधनात म्हणाले.
आज G20 होस्ट करने का भारत को अवसर मिला है। पिछले एक साल से देश के हर कोने में जिस प्रकार से G20 के अनेक आयोजन व कार्यक्रम हुए हैं, उसने देश के सामान्य मानवी के सामर्थ्य से दुनिया को परिचित करवा दिया है। भारत की विविधता को दुनिया अचंभे से देख रही है, जिस कारण भारत का आकर्षण बढ़ा… pic.twitter.com/WS0DkGTrge
— BJP (@BJP4India) August 15, 2023
दरम्यान, आज संपूर्ण देश ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सलग 10व्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. त्यांनी यावेळी ९० मिनिटांचे भाषण केले. भाषणा दरम्यान, पंतप्रधानांनी मणिपूर हिंसाचार, सुधारणांबाबत भूमिका स्पष्ट केली.