Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच पक्षांकडून प्रचार सभांचा धडाका सुरु आहे. जास्तीत जास्त मते आपल्या झोळीत पाडण्यासाठी ठिकठिकाणी सभांचे आयोजन केले जात आहे. तसेच येत्या निवडणुकीत कुणाला किती मत पडणार यासाठी सर्व्हे सुद्धा केलेलं जात आहे. यावरून कोण बाजी मारणार कुणाला किती मत पडणार याच्या अंदाज घेतला जात आहे. लोकसभेच्या मतदानादरम्यान येत असलेल्या सर्व्हेनुसार ही निवडणूक भाजपासाठी सोपी नाही, असे एका वृत्तवाहिनीने केलेल्या सर्व्हेत म्हटले जात आहे.
दरम्यान, निवडणूक भाजपासाठी सोपी नाही यावरून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांना मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, ‘कोणतीही निवडणूक सोपी नसते. पण महाराष्ट्रात आमच्यासाठी लोकसभा अग्निपथही नाही. पंतप्रधान मोदींनी एक वातावरण तयार केले आहे. त्यामुळे आम्ही विजय मिळवू, असे आम्हाला वाटते.असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केले आहे.
ते पुढे म्हणाले,’निवडणुकीत आव्हान तर असते. आपण जिंकणारच आहोत, असे समजून चाललो की, आपले जिंकण्यासाठीचे प्रयत्न कमी होतात. त्यामुळे मी प्रत्येक निवडणूक आव्हान समजूनच लढत आलो आहे. महाराष्ट्रात विजय मिळविण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली आहे. पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेला प्रचंड गर्दी होत आहे. प्रचारासाठी फिरत असताना लोकांचा जो प्रतिसाद मिळत आहे, तो पाहता आम्हाला विजयाची खात्री आहे.’ असे ते म्हणाले.
हे वाचाल का ? अमोल मिटकरी म्हणाले,’शरद पवारांच्या धनंजय मुंडेंवरील टीकेमुळे वैयक्तिक दुःख…’