भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
ठिकाण – वानखेडे स्टेडियम, मुंबई
वेळ – दुपारी 1ः30 पासून
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्टस
मुंबई – भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून तिन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होत आहे. यातिल पहिला सामना आज येथिल वानखेडे स्टेडियमवर होत असून यंदा भारतात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी ही मालिका दोन्ही संघांच्या दृष्टीनो महत्वाची असल्याने याकडे रंगित तालिम म्हणूनच पाहिले जात आहे.
दोन्ही संघांची फलंदाजी व गोलंदाजी तुल्यबळ आहे मात्र, भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा या पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याने संघाचे नेतृत्व अष्टपैलु हार्दिक पंड्याकडे असल्याने त्याच्याही कामगिरीकडे लक्ष राहणार आहे. याच दोन संघात नुकतीच पार पडलेली चार कसोटी सामन्यांची मालिका भारतीय संघाने 2-1 अशी जिंकली असून एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठीही भारतीय संघ जीवाचे रान करेल. त्यातच ही मालिका भारतातच होत असल्याने भारतीय संघाला त्याचा अतिरीक्त लाभ होणार आहे.
भारताची फलंदाजी भक्कम असली तरीही त्या सातत्य नसल्याने या सामन्यात भारतीय संघाला ही उणिव भरून काढावी लागणार आहे. सलामीला इशान किशनसह शुभमन गिल डावाची सुरुवात करेल. त्यानंतर विराट कोहली, सूर्यकुमार यादाव, बदली कर्णधार हार्दीक पंड्या, रवींद्र जडेजा अशी फलंदाजीची फळी असेल. त्यातही लोकेश राहुलला अंतिम संघात स्थान देण्यासाठी इशान किंवा गिल यांच्यापैकी एकाला वगळावे लागणार आहे. मात्र, राहुल सातत्याने अपयशी ठरला असल्याने त्याला संधी मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे.
लक्षवेधी
– आजवर या दोन संघात एकूण 143 सामने
– ऑस्ट्रेलियाचे 80 तर भारताचे 53 विजय
– 10 सामने अनिर्णित
– यापूर्वी झालेल्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा विजय
– याच मैदानावर याआधी झालेल्या लढतीत भारताचा पराभव
– मुंबईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची कामगिरी निराशाजनक
– वानखेडे मैदान कोहलीसाठी लकी
– त्याच्याच कामगिरीकडे लक्ष
गोलंदाजीतही भारताकडे खूप पर्याय आहेत. मात्र, महंमद शमी व महंमद सिराज याच दोघांना खेळवले जाण्याची शक्यता जास्त आहे. पंड्या वेगवान गोलंदाजी करु शकत असल्याने अतीरिक्त तिसरा वेगवान गोलंदाज खेळवण्याची गरज निदान भारतात तरी वाटत नाही. फिरकीची जबाबदारी जडेजासह यजुवेंद्र चहल, अक्सर पटेल यांच्यावरच राहिल. त्यातही पटेलने आपले अष्टपैलुत्व सिद्ध केल्यामुळे त्याला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. किशन संघात असल्यामुळे वेगळा यष्टीरक्षक खेळवण्याचीही शक्यता संपूष्टात आली आहे. कागदावर पाहिले तर भारताचा हाच संघ बलाढ्य वाटतो.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियालाही कमी लेखून चालणार नाही. त्यांच्या काही खेळाडूंनी कसोटी मालिकेदरम्यान मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला होता तसेच काही खेळाडूंना दुखापतींनीही सतावले आहे. मात्र, एकदिवसीय संघातील काही खेळाडू हे भारतीय वातावरणात खेळत असल्याने त्यांनाच रोखण्याचे आव्हान बारतीय गोलंदाजांसमोर राहणार आहे.
विशेषतः दुखापतीतून सावरलेले डेव्हीड वॉर्नर व ग्लेन मॅक्सवेल हे आयपीएलमध्ये यशस्वी ठरत असल्याने ते जास्त धोकादायक ठरतील. त्यांच्या संघाचे नेतृत्व बदली कर्णधार स्वीव स्मिथच करत असून फलंदाजीत वॉर्नर, मॅक्सवेलसह मिशेल मार्श, मार्नस लेबुशेन, कॅमेरुन ग्रीन, ऍश्टन ऍगर यांच्यावर राहणार आहे. गोलंदाजीत नियमित कर्णधार पॅट कमिन्स नसला तरीही मिचेल स्टार्क, जोस इंग्लिस, ऍडम झम्पा व सीन अबॉट हे सामन्याचे चित्र पालटवू शकतात.
WTC 2023 final : गावसकरांना पुन्हा राहुलचा कळवळा, म्हणाले “विजेतेपद मिळवायचे असेल तर भरतला…”
सूर्य तळपणार का…
मुंबईचा स्टार फलंदाज व गेल्या तिन मौसमापासून भारतीय संघाच्या मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव चांगलाच भरात आहे. केवळ टी-20 क्रिकेटच नव्हे तर एकदिवसीय क्रिकेटमध्येही आता तो भारताच्या आक्रमक फलंदाजीचा मुख्य आधारस्तंभ मानला जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या संमिश्र गोलंदाजांसमोर त्याला रोखण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. तो यशस्वी ठरला तर भारतीय त्रिशतकी धावसंख्या निश्चितच उभाररू शकतो तर त्याचा पाठलागही यशस्वीरीत्या करु शकतो.