PM Narendra Modi | लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. यानंतर आता येत्या 7 मेला देशातील तिसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात सभांचे आयोजन करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात 29 आणि 30 एप्रिल रोजी सहा सभा होणार आहेत. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या सोमवारी आणि मंगळवारी प्रत्येकी तीन सभा होणार आहेत. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सोमवारी सोलापूर, कराड आणि पुणे येथे आणि मंगळवारी माळशिरस, धाराशिव आणि लातूर येथे प्रचारसभा होणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी पंतप्रधान मोदी यांच्या राज्यातील दोन दिवसांतील सभांच्या कार्यक्रमाची माहिती दिली आहे.
पंतप्रधान मोदींची 29 एप्रिल रोजी कुठे आणि कधी होणार सभा? PM Narendra Modi |
– सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी दुपारी दीड वाजता होम मैदान येथ मोदींची सभा होणार आहे.
– उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कराड येथे दुपारी 3:45 वाजता सभा होणार आहे.
– पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे, बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ पुण्यातील हडपसर येथे रेसकोर्स मैदानावर संध्याकाळी 5:45 वाजता मोदींची सभा आयोजित करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींची 30 एप्रिल रोजी कुठे आणि कधी होणार सभा? PM Narendra Modi |
– माढामधील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी 30 एप्रिल मंगळवारी दुपारी 11:45 वाजता माळशिरस येथे सभा होणार आहे.
– धाराशिव येथे महायुतीच्या उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अर्चना पाटील यांच्यासाठी दुपारी दीड वाजता सभा होणार.
– तर लातूर येथे भाजपाचे सुधाकर शृंगारे यांच्यासाठी दुपारी 3 वाजता सभा होणार आहे.
दरम्यान, बारामती, शिरूर, मावळ आणि पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 एप्रिल रोजी जाहीर सभा घेणार आहे. या शिवाय, पंतप्रधान मोदी यांचा पुण्यात एक रोड शो आयोजित करण्यात आला आहे.
मोदी यांच्या ‘रोड शो’साठी महायुतीकडून संयुक्त तयारी करण्यात येत असून महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा:
उद्धव ठाकरेंची जहरी टीका,’मोदींचा आधी काय रुबाब होता? कारण शिवसेना सोबत होती आता मात्र…’