पिंपरी, (प्रतिनिधी)- मावळ लोकसभा मतदारसंघासाठी 35 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. या मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत सोमवारी (दि.29) दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे सोमवारी दुपारी स्पष्ट होणार आहे.
मावळ मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास 18 एप्रिलपासून सुरुवात झाली.मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूकीच्या उमेदवारी अर्जांची शुक्रवारी (दि.26) छानणी प्रक्रिया पार पडली. या छाणनी प्रक्रियेत 35 उमेदवारांचे उमदवारी अर्ज वैध ठरले असून 3 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले. तर 50 उमेदवारी अर्जांपैकी 46 अर्ज वैध ठरली असून 4 उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत.
आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये मुदतीत 38 उमेदवारांनी 50 नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. या नामनिर्देशन पत्रांची शुक्रवारी (दि.26) छाननी प्रक्रिया पार पडली.
निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी यावेळी वैध आणि अवैध ठरलेल्या नामनिर्देशन पत्रांची घोषणा केली. दरम्यान, अर्ज माघारीनंतर म्हणजे सोमवारी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यावेळी मावळ लोकसभा मतदार संघातील लढतीचे चित्र स्पष्ट होईल.