भारतीय संघ आजपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. खरेतर ही मालिका केवळ तिनच सामन्यांची असली तरीही त्यातील पहिल्या सामन्यात अष्टपैलु हार्दीक पंड्या भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. पंड्या एकदिवसीय संघाचे नेतृत्व करणार ही आगामी काळीतील एक चाचणीच ठरणार आहे. कारण यंदाच्याच वर्षी भारतात एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा होत आहे.
नियमित कर्णधार रोहित शर्मा केवळ कसोटीचा कर्मधार राहील व पंड्याकडे मर्यादीत षटकांच्या सामन्यांचे नेतृत्व येइल असे सुतोवाच निवड समितीनेच काही महिन्यांपूर्वी केले होते. मात्र, ते अधिकृतरीत्या कधी घोषित करणार हे पंड्याच्या नेतृत्वातील यशानंतरच ठरेल. सध्यातरी पंड्या संघातील वरिष्ठ व नवोदित यांच्यात कसा समतोल साधतो व आपला इगो कमी ठेवून दुसऱ्यांचेही सल्ले स्वीकारतो का हे पाहणे महत्वाचे आहे.
कारण कधीकाळी घरच्या परिस्थितीत एकवेळ मॅगी बनवून खाणारा पंड्या नंतर पैशेवाला झाल्यावर खूप अहंकारी झाल्याचे अनेकदा कानावर आले आहे. ते काहीही असो स्वभाव प्रत्यक्ष सामन्यात तरी महेंद्रसिंह धोनीसारखा मवाळ हवा. पंड्या, रोहित काय किंवा विराट कोहली काय धोनीच्या नखाचीही सर नाही हे जरी सत्य असले तरीही आता जर त्याने संघबांधणी यशस्वी केली व पहिल्याच एकदिवसीय सामन्यातीर परिक्षा उत्तीर्ण केली तर भविष्यात त्याचा कर्णधारम्हणून विचार निश्चितच केला जाइल.
WTC 2023 final : गावसकरांना पुन्हा राहुलचा कळवळा, म्हणाले “विजेतेपद मिळवायचे असेल तर भरतला…”
पंड्या हा वेस्ट इंडीयन क्रिकेटपटूंसारखा नैसर्गिक खेळाडू आहे. त्याला संयम ठेवायला सांगणे म्हणजे वाघ सिंहांना गवत खायला लावण्यासारखे आहे. मात्र, नेतृत्वाची जबाबदारी भल्या भल्या आक्रमक खेळाडूंना जमिनीवर आणते. महंमद अझरुद्दीन, सौरव गांगुली, राहुल द्रविड, अनील कुंबळे, महेंद्रसिंह धोनी व विराट कोहली आणि रोहित शर्मा हे खेळाडू म्हणून मोठे असले तरीही कर्णधारम्हणून केवळ अझर, गांगुली व धोनीचेच नाव घेतले जाते. आता तशीच ओळख पंड्याला तयार करावी लागणार आहे. हे करताना तो कोहलीचा वारसदार होतो की धोनीचा ते येत्या काळात कळेलच.