Lok sabha election 2024 । लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील जागावाटपावरून निर्माण झालेला महाविकास आघाडीतील तिढा कायम आहे. त्यामुळे कॉंग्रेसने ६ जागांवर मैत्रीपूर्ण लढतींची चाचपणी सुरू केली आहे.
महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्षांमध्ये कॉंग्रेस, शिवसेनेचा ठाकरे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा शरद पवार गट यांचा समावेश आहे. त्या घटक पक्षांत राज्यातील लोकसभेच्या एकूण ४८ जागांचे वाटप करण्यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. जागावाटपाच्या संघर्षांवरून महायुतीला नेत्यांनी टीका केली आहे. या टिकवर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिउत्तर दिल आहे.
दरम्यान, जागावाटपाच्या तिढ्यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महायुतीतवर निशाणा साधला आहे. माध्यमांशी बोलतांना त्या म्हणाल्या,’जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये कुठलीही बिघाडी नाही, हे फक्त जाणूनबुजून दाखवले जात. छोटे मोठे वाद होते ते मिटतील. ठाण्यात आतापर्यंत इतक्या केसेस टाकल्या तरी शिवसैनिक मागे हटला नाही. ठाण्यात गद्दारीला थारा नाही. निष्ठेचा इतिहास आहे. ठाण्यात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीला उभे राहिले, तरी विजय आमचाच होणार. आम्हीच जिंकणार. नरेंद्र मोदींनी ठाण्यात अर्ज भरावा, पण विजय राजन विचारे यांचाच होईल’ असा दावा करत सुषमा अंधारे यांनी महायुतीवर हल्लाबोल केला.
त्या पुढे म्हणाल्या,’प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांवर केलेल्या आरोपांना स्पष्टपणे उत्तरेही दिली. वंचित बहुजन आघाडीची मुंबईत सभा झाली तेव्हा उद्धव ठाकरेंना निमंत्रण का दिले नाही? इंडिया आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण त्यांना दिले तेव्हा प्रतिसाद दिला नाही. मनुवादी विचारांविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेचे पाईक म्हणून प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत यावे ही अपेक्षा आहे. आम्ही ४ ऐवजी ५ जागांचा प्रस्ताव पाठवला होता.’ असेही त्यांनी सांगितले.
हे वाचले का ? ‘अजितदादाची दुसरी बायको म्हणजे सुनील तटकरे’ – जयंत पाटील यांचा घणाघात