मुंबई : कोरोना व्हायरसचा जगसह भारतातही प्रादुर्भाव वाढत चालला आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचे काटेकोर पालन होण्यासाठी २४ तास ऑन डयूटी कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनाच आता कोरोनाचा काही प्रमाणात विळखा पडला आहे.
येत्या काळात पोलिसांसमोर आणखी मोठे आव्हान उभे राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रीय पोलीस दलाच्या (सीएपीएफ) २० कंपन्यांची म्हणजेच २००० हजार सशस्त्र पोलिसांची मागणी केंद्राकडे केली आहे.
काय नेमकं म्हणाले अनिल देशमुख?
‘राज्यात पोलीसांना कोरोनाची लागण झालीय, त्यांच्या कामाची वेळ व आव्हानंही दिवसागणिक वाढतायत व रमज़ान ईद ही येऊ घातली आहे. म्हणूनच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्याने तातडीने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २० कंपन्यांची केंद्राकडे मागणी केली आहे.’