नगर – कोणत्याही संकट काळात शिवसेनेने नेहमीच सामान्य जनतेची काळजी केली. त्यांना संकटकाळात मदत करण्यासाठी शिवसेना नेहमीच आघाडीवर राहिली. त्यामुळे करोनासारख्या साथीच्या रोगाने थैमान घातलेले असताना त्यातून सामान्य नागरीकांना वाचविण्यासाठी आवश्यक असलेल्यामास्कचे वाटप करत असल्याची भूमिका ज्येष्ठ शिवसेना नेते अंबादास पंधाडे यांनी व्यक्त केली.
शिवसेनेचे युवा नेते तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांच्या पुढाकारातून दिल्लीगेट येथे आज नागरीकांना मास्कचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. माजी नगरसेवक संजय शेंडगे, युवासेना प्रमुख हर्षवर्धन कोतकर, अनिल शिंदे, दत्ता कावरे, गणेश कवडे, सचिन शिंदे, आप्पा नळकांडे अनिल बोरूडे, सागर गायकवाड, जयंत येलूलकर, श्रीनिवास बोज्जा, संग्राम कोतकर, संग्राम शेळके, विजय पठारे आदी यावेळी उपस्थित होते.
संभाजी कदम म्हणाले, “”शिवसेना नेहमी गोरगरीबांची सेवा करण्यात तत्पर असते. करोनासारख्या संकटाने अवघा देश हादरला आहे. त्यात गोरगरीबांचे हाल होत आहेत. त्यात सामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मास्कचे वाटप करत आहोत.” गणेश कवडे यांनीही मनोगत व्यक्त केले.