वालचंदनगर -करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक फटका नाभिक समाजातील सलून व्यवसायिकांना बसला आहे. याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातील नाभिक बांधवांनी सलून दुकाने उघडण्यासाठीची कायदेशीर परवानगी किंवा शासनाकडून मदत मिळावी अशा प्रकारच्या मागण्यासंर्दभात शांततेच्या मार्गाने निवेदन देत आपल्या भावना शासनदरबारी पोहोचविल्या आहेत. याच अनुषंगाने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची इंदापूर तालुक्यातील नाभिक बांधवांच्या शिष्टमंडळाने भेट घेत त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
आगामी काळात पुणे जिल्हा नाभिक महामंडळाचे अध्यक्ष रमेश राऊत यांच्या नेतृत्वाखाली नाभिक समाजाच्या न्याय हक्सकासाठी समस्त नाभिक बांधवांना बरोबर घेऊन इंदापूर तालूक्यात मोठे आंदोलन करणार असल्याचे सणसरचे नाभिक समाज प्रतिनिधी धनंजय गायकवाड यांनी सांगितले.
याप्रसंगी नाभिक समाजाचे मार्गदर्शक संतोष सपकळ, अनिल खंडागळे, जयवंत साळुंके, प्रमोद खंडागळे, कालिदास राऊत, राहुल खंडागळे, सोमनाथ गाडेकर, तेजस गाडेकर, राजेंद्र धारे, विशाल देवकर, संजय गाडेकर, महेश गाडेकर, मुकुंद शिंदे,संजय धारे, वैभव राऊत, बंडु मोरे उपस्थित होते.
नाभिक समाजाच्या प्रमुख मागण्या उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या तातडीने पोहोचवून नाभिक बांधवांना लवकरात लवकर न्याय देण्यासाठी म्हणून काम करणार आहे. तसेच अर्थिक मदत देण्यासंर्दभात अजित पवार यांच्याकडे आग्रही भूमिका घेणार आहे.
– दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री