Praksh Ambedkar Letter to Congress – लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगातर्फे निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून राजकीय पक्षांनी उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात मात्र भाजपने जाहीर केलेले २० उमेदवार वगळता महायुती व महाविकास आघाडीचे गाडे अद्यापही जागावाटपावर अडले असल्याचे चित्र आहे. अशातच गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीत सामील होण्याबाबत खलबते सुरु असतानाच, प्रकाश आंबेडकर यांनी ‘लेटर बॉम्ब’ टाकला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहले आहे. या पत्राद्वारे त्यांनी, काँग्रेसला ७ जागांवर बिनशर्त पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. ‘काँग्रेसने महाविकास आघाडीच्या कोट्यातून त्यांच्या वाट्याला आलेल्या ७ जागांची यादी आम्हाला पाठवावी, आम्ही या जागांवर काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा देऊ’, असं आंबेडकर यांनी पत्राद्वारे म्हंटल आहे.
उद्धव ठाकरे अन् शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप | Praksh Ambedkar Letter to Congress
प्रकाश आंबेडकर यांनी या पत्राद्वारे उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या गटावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच या दोन्ही पक्षांवरचा आपला विश्वास आता उडाला असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
‘वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण न देता, महाविकास आघाडीच्या बैठका सुरु आहेत. निवडणुकीची घोषणा झाली असताना हे होतंय. उद्धव ठाकरेंची शिवसेना व शरद पवार यांची राष्ट्रवादी बैठकीला उपस्थित आमच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेत नाहीत. या दोन्ही पक्षावरील माझा विश्वास आता उडाला आहे.’ असा स्फोटक उल्लेख प्रकाश आंबेडकर यांनी पत्रामध्ये केला आहे.
भाजप – आरएसएसचे सरकार आम्हाला हटवायचे आहे | Praksh Ambedkar Letter to Congress
या पत्रामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. हे सरकार असंवैधानिक असून आम्हाला भाजप – आरएसएस सरकारला सत्तेतून खाली खेचायचे आहे, असं प्रकाश आंबेडकर पत्रामध्ये लिहतात. याच उद्देशाने आम्ही ७ जागांवर काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी पत्राद्वारे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना कळवले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Lok Sabha 2024: एकही खासदार नसलेला पक्ष बनला महाविकास आघाडीची “डोकेदुखी’
घड्याळ दादांना गेलं, साहेबांच्या पदरात काय पडलं? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल…