तळेगाव स्टेशन,(वार्ताहर) – मावळ शिक्षक प्रबोधन परिवार संचलित वसंतचैतन्य व्याख्यानमाला उत्साहात संपन्न झाली. यात माजी सनजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख, हास्य कवी अशोक नायगावकर, अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
व्याख्यानानंतर ११ गुणवंत शिक्षकांना ‘सानेगुरुजी पुरस्कार’, ‘राष्ट्रमाता जिजाऊ गुणवंत शिक्षिका पुरस्कार’ तर तालुक्यात आदर्श काम करणाऱ्या ११ शिक्षक जोडप्यांना ‘साऊ-ज्योती गुणवंत शिक्षक दाम्पत्य पुरस्कार’ अशा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
इंद्रजित देशमुख यांनी ‘माणूस म्हणून जगण्यासाठी..’ आपल्याला समाजधुरिणांच्या मार्गाने चालण्याचा सल्ला दिला. आपल्या निरामय जगण्यासाठी हास्यविनोद अत्यंत आवश्यक आहे आणि यातूनच आपल्या निरोगी जीवनाची पायाभरणी होते, असे अशोक नायगावकर यांनी सांगितले. तर, विद्यार्थी दशेतील कोवळ्या मुलांना त्यांच्या नैसर्गिक पर्यावरणातील भाषेतून म्हणजेच त्यांच्या मातृभाषेतूनच शिक्षण मिळाले पाहिजे, असे मत चिन्मयी सुमित यांनी व्यक्त केले.
राजू भेगडे, शिवाजी ठाकर, वसंतचैतन्य व्याख्यानमालेचे अध्यक्ष रामराव जगदाळे, बाळासाहेब घारे, मारुती लायगुडे, नारायण गायकवाड, संतोष राणे, उमेश माळी, सुहास धस, संतोष भारती, अजिनाथ शिंदे, अतुल वाघ, ज्ञानेश्वर शिवणेकर, भरत शेटे, संजय ठुले, राहुल जाधव, गंगासेन वाघमारे आदींनी संयोजनासाठी परिश्रम घेतले.
पुरस्कारार्थीं
सानेगुरुजी गुणवंत शिक्षक पुरस्कारार्थींमध्ये लक्ष्मण कांबळे, बाळासाहेब चोरघे, महादू केदारी, संतोष कांबळे, काळु गुणाट, धोंडीबा घारे, गौतम जुगदार, संदीप सकपाळ, विकास भवार, जयवंत पवार यांचा तर, राष्ट्रमाता जिजाऊ गुणवंत शिक्षिका पुरस्कारार्थीमध्ये सुलभा गायकवाड, गीतांजली काटे, किरण लाहुडकर, सुरेखा बारवकर, वैशाली पवार, सविता पेटकर, वनिता राजपूत, दीपाली अंगीर, प्राजक्ता वाघोले, अर्चना गाढवे, प्रतिभा पाटील,
पौर्णिमा ढमाले यांचा तर, साऊ-ज्योती गुणवंत दांपत्य पुरस्कारार्थींमध्ये वैशाली विश्वासराव, उमेश विश्वासराव, उज्वला डोके, मारुती डोके, मनीषा नवले, धनंजय नवले, कविता मोरमारे, अंकुश मोरमारे, स्वाती जानराव, धिरजकुमार जानराव, अनिता बारवे, अशोक बारवे, अनुजा धस, सुहास धस, मनिषा कोल्हे, बन्सिलाल कोल्हे, स्नेहल पाष्टे, सुनिल पाष्टे, वैशाली मिसाळ, अशोक मिसाळ, अश्विनी आहेर, त्र्यंबक आहेर यांचा समावेश आहे.