कोलकता – पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील बागुआती भागात तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षात एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. अर्जुनपूर पश्चिमपारा येथे शनिवारी रात्री हाणामारी झाली.
या हाणामारीनंतर दगडफेकही झाली. या दगडफेकीत एक जण गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
संजीव दास उर्फ पोतला असे मृताचे नाव आहे. संजय दासवर शस्त्रास्त्र कायद्याशी संबंधित 11 गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली आहे.
स्थानिक नगरसेवकासाठी काम करणाऱ्या टीएमसी कार्यकर्त्यांचा या घटनेमागे हात असल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे.
दुसऱ्या एका घटनेत भाजपच्या एका महिला नेत्याने दक्षिण कोलकाता येथील आनंदपूरमध्ये टीएमसी कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी टीएमसी कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा आरोप केला आहे.
आपल्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचा दावा भाजप नेत्याने केला आहे. इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत निवडणूक बॅनर आणि पोस्टर लावत असताना हा हल्ला झाल्याचे तिने सांगितले.