मुंबई – भाजप विरोधात असलेल्या इंडिया आघाडीची सध्या देशभर चांगलीच चर्चा आहे. असं असलं तरी भविष्यातील निवडणुकांमध्ये ही आघाडी नेमकी कशी लढणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नुकतीच मुंबईत पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीत जाण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा सुरु आहे.
या चर्चांवरून एका वृत्तवाहिनीने मुलाखती दरम्यान प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीच्या बैठकीचे आमंत्रण तुम्हाला आले होते का? अनेकांची इच्छा होती असे का झाले नाही ? असा प्रश्न विचारला यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले,”ते तुम्ही सोनिया गांधींना विचारा. मला आमंत्रण अजिबात नव्हते. आम्ही ‘इंडिया’मध्ये जाण्यासाठी इच्छुक आहोत. गेले पाहिजे मात्र बिन बुलाये मेहमान म्हणून आम्ही जाणार नाही.’ असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.