पिंपरी – महापालिका आयुक्तांची मनमानी आणि मग्रुरी लक्षात येते. शिवसेना ती सगळी नीट करेल, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी थेट महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यावरच निशाणा साधला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)च्या वतीने सोमवारी (दि. 5) आकुर्डीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दानवे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. दरम्यान आयुक्तांनी दानवे यांना पत्रकार परिषदेसाठी पालिकेचे सभागृह उपलब्ध करुन दिले नसल्याच्या अफवांनी जोर धरला होता. याबाबत दानवे यांना विचारले असते त्यांनी असे काही घडल्याचा नकार दिला. ते म्हणाले की, मला प्रोटोकॉल होता. त्यामुळे मी लवकर निघालो. पत्रकार परिषदेकरिता हॉल उपलब्ध न करून देण्याची हिंमत ते करू शकत नाहीत. परंतु त्यांची मनमानी, मग्रुरी लक्षात येते. परंतु शिवसेना ती सगळी नीट करेल.
आकुर्डीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दानवे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले की, महापालिकेच्या घोटाळ्यात सरकारमधील मंत्र्यांचा सहभाग आहे राज्याचा नगरविकास विभाग व स्थानिकांचादेखील यात सहभागी आहे. याबाबतीत फेवरिज्म होत असताना, गैरव्यवहार सुरू असताना शिवसेना डोळे झाकून हे बघणार नाही, या विरोधात आवाज उठवू, असे ते म्हणाले.
यावेळी आमदार सचिन अहिर, माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शहर प्रमुख अॅड. सचिन भोसले, माजी नगरसेवक एकनाथ पवार, संघटक संतोष सौंदणकर आदी उपस्थित होते.
शासन आपल्या दारी ही स्टंटबाजी
राज्य सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमावर त्यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले की, हा उपक्रम केवळ एक स्टंटबाजी आहे. जनतेचे प्रश्न जसेच्या तसे आहेत. याठिकाणच्या लोकप्रतिनिधी विशेषत: आमदार, खासदारांनी जनतेला केवळ आश्वासने दिली आहेत. भाषणे केली आहेत. मोठ मोठ्या गप्पा मारल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा, स्वच्छतेचा अतिक्रमणाचा आरोग्याचे प्रश्न प्रलंबित आहेत. पाच – पाच वर्षे प्रश्न प्रलंबित आहेत. मग शासन कोणाच्या दारी जाते. इथल्या सत्ताधारी पक्षाचे लोक काय करतात? इथले आमदार, खासदार काय दिवे लावतात. जनतेचे प्रश्न जसेच्या तसे आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणावार ठेकेदारी करत आहेत. जनतेच्या प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष लोकप्रतिनिधीं ठेकेदारी व अन्य बाबतीत गुंतले आहेत. म्हणून शिवसेनेेने या विषयावर लक्ष दिले आहे. शहरातील अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळेच जनेतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेनेच्या वतीने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.
जनता दरबारात 203 तक्रारी
आकुर्डी येथे शिवसेनेने आयोजित केलेल्या जनता दरबारमध्ये एकूण 203 तक्रारी प्राप्त झाल्या. 69 तक्रारींबाबत संबंधितांना पत्र दिले आहे. तर 34 तक्रारी जागेवर निकाली काढल्या असल्याची माहिती दानवे यांनी दिली. तर जिल्हा प्रशासन व राज्य सरकारशी संबंधित तक्रारींचा मी पाठपरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले.