पिंपरी – पीएमपीमध्ये फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 23 ते 30 सप्टेंबर दरम्यान पीएमपी प्रशासनाने केलेल्या कारवाईत 3 लाख 9 हजार 500 रुपयांचा दंड विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून वसूल केला आहे.
पीएमपीने 23 ते 30 सप्टेंबर या कालावधीत बस तपासणी दरम्यान 619 विनातिकीट प्रवासी आढळले. त्यांच्याकडून या कालावधीत 3 लाख 9 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. पीएमपीकडून प्रती प्रवासी रक्कम रुपये 500 दंड आकारण्यात येतो. त्यानुसार हा दंड वसूल करण्यात आला. त्यात सर्वाधिक दंड हा 25 सप्टेंबर रोजी 54 हजार रुपये त्या खालोखाल 48 हजार रुपये 26 सप्टेंबरला तर, 42 हजार 500 23 सप्टेंबरला दंड वसूल केला. तसेच 30 सप्टेंबरला 21500 रुपये सर्वात कमी दंड वसूल करण्यात आला असून प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये, असे आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे.
23 ते 30 सप्टेंबरची आकडेवारी पुढील प्रमाणे ः 23 सप्टेंबर – 42 हजार 500, 24 सप्टेंबर – 32 हजार 500, 25 सप्टेंबर – 54 हजार, 26 सप्टेंबर – 48 हजार, 27 सप्टेंबर – 40 हजार 500, 28 सप्टेंबर – 28 हजार 500, 29 सप्टेंबर – 42 हजार आणि 30 सप्टेंबर – 21 हजार 500 असे एकूण 3 लाख 9 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.