नागपूर ( Ajit Pawar on Devendra Fadanvis ) – राज्यात ज्या दिवसापासून महाविकास आघाडीचे सरकार आले, त्या दिवसापासून त्यांना वेदना होत होत्या. त्यामुळे ते कामाला लागले होते. हे आता जगजाहीर झाले आहे. त्यांनी आता नाकाखालून घेतले की कुठून घेतले हा संशोधनाचा भाग आहे. हे वेशभूषा बदलून जायचे, असे प्रत्युत्तर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले.
तुम्हाला सरकार टीकवता आले नाही. तुमचं नाकाखालून सरकार गेले, असे म्हणत फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले, त्यांनी नाकाचा उल्लेख करावा, हे अगदी दुर्दैवं आहे. प्रत्येकाची नाकं तपासावी लागतील. त्याच्या खोलामध्ये मला जायचे नाही.
एकेकाळी हेच लोक म्हणायचे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय अंतर्गत आहे. आमचा काहीच संबंध नाही. त्यानंतर तेच म्हणाले, आम्ही बदला घेतला.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीसांबद्दल केलेल्या विधानावर अजित पवारांनी पलटवार केला आहे. तो त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. कोणाला काय करावे ते त्यांनी बघावे. आमचा काहीही संबंध नाही.
आम्ही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्यामध्ये नाक खूपसायचं काहीही कारण नाही. यांनी जरी आमचं नाकाखालनं सरकार काढलं असलं तरी, आम्ही तिथे नाक खुपसायला जात नाही, असा टोला त्यांनी लगाविला.